Tuesday, August 18, 2020

गुलज़ारवरचं मराठी लोकांचं प्रेम पाहून मला कधीकधी शंका येते गालिब हा मराठी कवी होता काय ?

Monday, August 17, 2020

निशिकांत कामत  श्रीधर तिळवे नाईक

निशी गेला आमच्या रुइया कट्ट्यावरचे एक ध्यासपर्व संपले अत्यंत मितभाषी , हुशार , दुःखाच्या गर्तेत बुडालेले डोळे घेऊन फिरणारा निशी मला प्रथम कट्ट्यावरच भेटला विषय अर्थातच भविष्य मला फ्लॅशेस  येतात हे रुईयाभर झाल्याने ह्या काळातल्या माझ्या अनेक ओळखी ह्या फ्लॅशेसनं व्हायच्या त्यातून पुढे एक गॅंग तयार होत गेली ह्यातले काही कॉलेजचे काही कट्ट्याचे मेम्बर्स निशी रुईया कॉलेजचाच ! मी चुकत नसेन तर कल्चरल सेक्रेटरीही झाला आमच्या ह्या गॅंगपूर्वी रुईयातल्या दोन गॅंग गाजल्या होत्या एक कवींची आणि दुसरी नाटकवाल्यांची विनय आपटे तिचा लीडर मात्र आमच्यापुढे त्यावेळी ह्या गँगचं नेतृत्व होतं ते महेश मांजरेकरकडं आमची तिसरी गॅंग होती जी स्वतंत्र असली तरी महेश मांजरेकरांच्या गॅंग विषयी अत्यंत आदर बाळगून होती आणि तिच्यात ज्ञानदा , प्रवीण दामले , मी असे कवीही होते आणि गजेंद्र अहिरे शेखर सरतांडेल सारखे नाटक फिल्मवालेही होते सर्वांच्याच सम्पर्कात असायची महेश मांजरेकर गँगचा अजय फणसेकर माझा बऱ्यापैकी जिवलग होता आणि तो निशिकांत कामतला घेऊन आला  आणि आमची ओळख झाली रुईयातल्या अनेकांच्याप्रमाणं त्याला सुपरस्टार व्हायचं होतं आणि अभिनयात करिअर होईल का हा त्याचा प्रश्न होता आणि दुसरा मी इथे सांगणार नाही मी उत्तर देऊ शकलो नाही कारण मला काही निशीबाबत फ्लॅश येईना मग त्याच्या दोन वाऱ्या झाल्या आम्ही ओळखायला लागलो आणि अचानक हा डीपीसमोर असतांना मला किक आली मी त्याला बोलावलं आणि म्हणालो डिरेक्शन्सचाही विचार कर !
म्हणजे अभिनेता म्हणून यश नाही
तस नाही पण अभिनेता म्हणून तुला जे भव्य यश हवं ते मला दिसत नाहीये

साहजिकच नंतर तो मला टाळायला लागला निगेटिव्ह प्रेडिक्शननंतर येणाऱ्या अशा रिऍक्शन्सची मला सवय झाली होती कारण कोल्हापुरात असतांना व्हायोलण्ट रिऍक्शन्सनाही  मला सामोरं जावं लागलं होतं ह्याबाबत माझा अटीट्युड जे दिसले ते  दिसले जे उखडायचं ते उखाडा असाच असायचा मग काही महिन्यांनी माझं दुसरं म्हणणं खरं झाल्याने तो आला आणि सोर्री म्हणाला मग आमचे संबंध चांगले झाले ते शेवटपर्यंत चांगलेच राहिले हळूहळू मी कवी वैगरेही आहे हे त्याला कळालं आणि नात्याला कलावंती किनार आली आम्ही दोघेही मराठी असलो तरी गोवन व कन्नड संस्कृतीचाही आमच्यावर थोडा परिणाम होता ज्याने कनेक्टिव्हिटी डेन्स केली

निशी टीचर्स फॅमिलीतून आला होता आणि आई संस्कृतची शिक्षिका असल्याने परंपरेशी त्याचे एक नाते होते

निशित एक आत्मधुंदता होती आणि ती ह्या व्यवहारी जगात कशी शाबूत ठेवायची हे त्याला सुरवातीला कळत न्हवते हळूहळू तो समतोल साधायला सरावला त्याचे कौटुंबिक आयुष्य त्यावेळी त्याला अकारण गुंतागुंतीचे वाटत होते हळूहळू त्याला मार्ग सापडायला लागला मीनव्हाईल तो थोडे एडिटिंगही शिकायला लागला आणि पुढे तो तीन वर्षे फक्त एडिटर म्हणून काम करणार  होता

कॅनरा आणि तुळू ह्या दोन संस्कृतीत (उत्तरेत मारवाडी बोहरा गुजराती असे आहेत )पैशाला असाधारण महत्व आहे तुम्ही पैसे कमावले नाहित कि तुम्हाला काही महत्त्व रहात नाही पण ह्याचा एक फायदाही असतो ह्या दोन्ही संस्कृतीतले लोक तुम्हाला मदत करायलाही तयार असतात ह्या संस्कृतीचा दबाव निशीवर ह्या काळात होता आपण पैसे कमावले पाहीजेत असं त्याला वाटायचे रुईया दादर माटुंगात असल्याने ह्या संस्कृतीचा परिणाम अटळ होता कॉस्मोपॉलिटन मराठी संस्कृती हे रुईयाचं वैशिष्ट्य जे आम्हा सगळ्यांच्यातच उतरलं त्याला निशी अपवाद न्हवता

निशी हळूहळू छोटीछोटी कामे करत फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवू लागला त्याचा मुख्य रस हा अभिनयातच होता मात्र त्याला कामे दिग्दर्शक म्हणून मिळायला लागली त्यामुळे अभिनयाबाबत मात्र आता गाडा सुपरस्टार झालो नाही तरी किमान उत्तम अभिनेता म्हणून नाव कमवेन असा झाला होता हवा आने दे हा डेब्यू असला तरी त्याला खरा ब्रेकथ्रू मिळाला तो सातच्या आत घरात मधून ! संजय सुरकरची माझ्या मते ही बेस्ट फिल्म ! ह्यातला अनिकेत हा ग्रे होता आणि निशिकांतने स्टाईल देत तो उत्तम पेलला मराठीला अलका कुबल व सचिंन टाईप टाइपमधून ज्यांनी बाहेर काढलं त्यातील ही एक फिल्म होती आणि त्यात निशीचाही वाटा होता ह्यादरम्यान आपणाला लग्न हवं आहे कि नाही ह्या त्याच्या डोक्यातल्या क्रायसिसला एक सुस्पष्ट आकार मिळायला लागला

माणसाला एकटेपणाचं ओझं तो अध्यात्मिक नसेल तर सहसा पेलत नाही निशिकांत आयुष्यभर एकट्याचे आयुष्य जगायचा प्रयत्न करत होता आणि त्याला ते झेपत न्हवते ह्यावर उपाय एकच होता सततचे काम !

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीतील जादुई क्षण आला निशीला डोंबिवली फास्ट मिळाला फॉलिंग डाऊन वर आधारित ह्या फिल्मने त्याला सर्वकाही दिले ह्या फिल्मला मराठीचे नॅशनल अवॉर्डही मिळाले फिल्म हिट झाली आणि तमिळमध्ये त्याचा रिमेक बनला मग हिंदीतला ब्रेक मुंबई मेरी जान आला दुर्देवाने ही फिल्म चालली नाही मग निशीचा रिस्क घ्यायचा उत्साह संपला व त्याने अत्यंत सेफ गेम खेळला फोर्स  फिल्म ऑलरेडी हिट होती
तिचा रिमेक बनवला मग दृश्यमचा रिमेक !दृश्यम हिट झाल्यावर निशीने पुन्हा एक मोठी रिस्क घेतली अक्टिंगवर रॉकी हँडसम त्याने दिग्दर्शन केले आणि अभिनयही ह्यातला व्हिलन जबरदस्त होता पण फिल्म चालली नाही निशिकांतने तो उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा सिद्ध केलं ह्यानंतर मात्र त्याच्या तब्येतीच्या तक्रारी डोकं वर काढायला लागल्या दिगदर्शनाची जबाबदारी घ्यावी कि न घ्यावी हा प्रश्न निर्माण झाला कारण दिग्दर्शन हे नेहमीच इर्रेग्युलर शेड्युलमुळे लाईफस्टाईल डिसीज घेऊन येतं निशीने अभिनयावर लक्ष्य केंद्रित केले

निशी हा खरेतर मूळचा अभिनेताच किंबहुना रुईयावर सगळे मूळचे अभिनेतेच पण जवळजवळ प्रत्येकाने नाव कमावले ते दिग्दर्शक म्हणून निशीने रुईया गँग्जची ही परंपरा टिकवली महेश मांजरेकरनंतर तोच एक असा होता ज्याचे हिंदीतही नाव होते

आजही निशी म्हंटलं कि मला आठवते ती त्याची शांतता आणि पॉजेस सक्सेसच्या आड अनेकांना ती दिसायची नाही बरं स्क्रॅच करून आतला निशी काढणं हेही जवळ जवळ अशक्य एखाद्या माणसाने समुद्र लपवावा आणि पाणपोई दाखवावी तसा तो होता

तो गेल्याने अख्खा रुईया कट्टा हळहळला असणार ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही काही दिवस तरी प्रत्येकाच्या काळजात पाली चुकचुकतील

निशाला माझा अखेरचा गुड बाय तो पॅकेजडील मधल्या पॅकेजला व्हिसा म्हणायचा मला खात्री आहे त्याच्या खिश्यात व्हिसा सापडणार नाही

श्रीधर तिळवे नाईक