Friday, July 3, 2020

सरोजखान अदाकारीची राणी श्रीधर तिळवे नाईक

सरोज खान गेल्या धकधक अरेस्ट झाल्याने गेल्या त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही कदाचित कारण क्रिएटिव्ह माणसं पैशाला पाच मिळतात अशी बॉलिवूडची गैरसमजूत आहे

त्यांची माझी भेट राजकुमार संतोषींच्या साल्याने किंवा चुलत साल्याने करून दिली होती मला  जोशी कि कांबळेसाठी झी अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यामुळे ही ऑफर आली होती कुठल्याही नवीन डिरेक्टरला बॉलिवूडमधली अनुभवी माणसं चाचपून बघत बसतात माझीही चाचपणी होणार ह्याची मला कल्पना होती बाईंनी मी त्यांचं कुठलं कुठलं काम बघितलंय म्हणून विचारलं मी म्हणालो मी लिरिकल कोरिओग्राफीचा कट्टर पुरस्कर्ता आहे म्हणून तुमच्याकडं आलोय त्या एका वाक्यानं बाई बदलल्या कारण बाई स्वतः लिरिकलच्या कट्टर समर्थक होत्या साहजिकच मग गाडी त्याच अंगाने गेली त्यांचा व्यासंग प्रचंड होता अनेक गाणी त्यांनी बघितली होती शेवटी त्या म्हणाला ."मला वेळ कमी आहे पण दोन गाणी मी करते "

बाई संपूर्ण चित्रपट करतात हे ऐकून होतो साला म्हणाला ह्याचा अर्थ उरलेली गाणी त्यांचा असिस्टंट करणार मला प्रॉब्लेम न्हवता चित्रपट झाला नाही पण बाई मनात ठसल्या त्या ठसल्याच

नृत्यावरची त्यांची निष्ठा केवळ वादातीत होती त्यांचे स्कूल काहीसे पारंपरिक होते पण त्यात नवे युग भरण्याची त्यांची ताकद होती त्यांची दोन गाणी ही माझ्या मते पॉप कोरिओग्राफीमधली माईलस्टोन आहेत पहिले क्लब स्टेज डान्सची परिभाषा बदलून टाकणारे तेजाब मधले एक दो तीन आणि दुसरे सेन्शुअस गाण्यातील बेटामधले  धक धक करने लगा परंपरेत राहूनही किती उत्कृष्ट काम करता येते त्याची ही दोन्ही गाणी उदाहरणे आहेत एक दो तीन ने मॉब हँडलिंग आणि रॅम्प वॊकिंग स्टेजच्या वापराचे नवे आयाम सादर केले हे त्यांनीच शोधलेले आयाम हमको आजकल है इंतजार मध्ये त्यांनी मोशन स्लो करत फार परिणामकारकतेने वापरले

धकधकला त्यांनी एक साधा गोठा किती लेव्हलला जाऊन सेन्शुअस करता येतो ह्याचे एक उदाहरणच प्रस्तुत केले हे ड्युएट होते तरीही ते कुठेही अश्लील न करता मादकतेची सगळी उंची ह्यात गाठली गेली ह्या गाण्यातली नायिका म्हणजे स्फोटक मादक दारूचे कोठार आहे शृंगार आणि लैंगिक भ्रम अश्लीलतेला टच करतात पण परततात ते अश्लीलतेत घुसत नाहीत मुखमुद्रा  आणि हस्तमुद्रा ह्या बाईंच्यापुढे हात जोडून उभ्या असत आणि कानात सांगत ही अशी अदाकारी करूया तामझामपेक्षा अदाकारी महत्वाची हे बाईंचे तत्वच होते

त्यांचे स्वतःचे आयुष्य म्हणजे एक निरंतर संघर्ष होता त्या ह्या संघर्षाच्या अनुभवातून बोलत स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या स्वभावातच होता केवळ कॉपी करणारे कोरिओग्राफर त्यांना चीड आणत चौथ्या नवतेत नृत्य आणि नृत ह्यांना समान महत्व आहे त्यांनी हा बदल स्वीकारला नाही त्या कायमच नृत्याची भाषा बोलत राहिल्या

आणि आता त्या गेल्या त्यांना माझी आदरांजली


श्रीधर तिळवे नाईक



इरफान 

Sunday, December 15, 2019

दर वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत एक तासाची ३८ व्याख्याने दिली मला वेळ मिळाला तर आणखी बहुदा ६२ व्याख्याने देईन कधीकाळी पीएचडीसाठी केलेले लिखाण सादर करणे असे त्याचे स्वरूप असले तरी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्यामुळे  ही व्याख्याने इंटरेस्टिंग बनतात माझ्या व्याख्यानांना इंटरनेट व त्यामुळे गूगल वापरण्याची नेहमीच अनुमती असते त्यामुळे विध्यार्थी काहीही विचारत असतात त्यांना इंटरेस्टिंग वाटेल ते दाखवत असतात कधीकधी गूगललाही दुरुस्त करायची वेळ येते विषय नाटक संहिता इझम्स असे असले  तरी माझ्या वर्गात रिअल नंबर व रॅशनल नंबर ह्यांच्यात फरक काय असा प्रश्न  रिऍलिझम संदर्भात एखादा मॅथ्सचा विद्यार्थी विचारतो  तर एखादा रॅशनॅलिझमच्या संदर्भात मुसलमानांचे ऑप्टिक्समधले योगदान सांगितले कि न्यूटनच्या आणि अल हायझ च्या ऑप्टिक्स मधला फरक विचारतो सगळ्या शाखा प्रशांखाची घुसळण माझ्या वर्गात होत असते एखादीचे आई आणि वडील दोघेही पोलीस असतात आणि तरीही हैद्राबादच्या रेप केसनंतर ती जेव्हा माझी आई पोलीस असूनही कधी कधी घाबरते असं सांगते तेव्हा काय प्रकारची असुरक्षितता आपण पसरवून ठेवलीये ते स्पष्ट कळते

ह्यावर्षी विद्यार्थ्यांनी आणि मंगेशने आग्रह धरल्यामुळे आणि ह्या आग्रहाला योगेश सोमण ह्यांनी मान दिल्याने मला बोलावले गेले अन्यथा ---- विद्यार्थ्यांचे मिळणारे प्रेम आणि वैयक्तिक प्रश्नांची चर्चा करताना सर आपल्या भल्याचाच विचार करतील हा त्यांनी दाखवलेला विश्वास मला नेहमीच महत्वाचा वाटत आलाय

नवीन पिढीला त्यांच्या पद्धतीने शिकवले कि हमखास प्रतिसाद मिळतो असा माझा अनुभव आहे छापीलतेत अडकलेल्या लोकांना हे पटवायचे कसे हा खरा प्रश्न आहे

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, August 20, 2019

खय्यामना आमच्या पिढीने ऐकले ते कभी कभी त्रिशूल पासून ते एव्हढे क्लासी संगीतकार आहेत ह्याची आम्हाला कल्पनाच न्हवती त्यांचं तोंडात बसलेलं पहिलं गाणं गापूची गापूची गम गम हे त्रिशूल मधलं लहानपणासाठी असली गाणी परफेक्ट !  पुढे संगीताची अधिक अक्कल आली आणि डान्ससाठी सोकावलेलं माझं शरीर डान्सिकल गाण्याव्यतिरिक्त मेलडीही ऐकायला लागले पुढे लक्ष्यात आले कि खय्यामसाहेबांची क्लासिकल इमेज इतकी त्यांच्या फॅन्सनी मोठी केलीये कि गापूची व तेरे चेहरेसे व मौसम मौसम लव्हली मौसम(थोडीसी बेवफाई ) सारखी गाणी चक्क कानाआड केली जातायत

लता मंगेशकरांनी त्यांचे सर्वात बेस्ट गाणे म्हणून रझिया सुलतान मधले ए दिले नादान निवडले तेव्हा थोडा धक्का बसला होता पण नंतर कळले कि बाई अधूनमधून घोषणा करत असतात मात्र हे एक अफलातून गाणे होते एव्हढे निश्चित

बाजार आणि उमराव जान कळस होते एका अर्थाने आमच्या पिढीने त्यांचा बेस्ट फॉर्म बघितला

त्याआधीची त्यांची "हे कली कली के लंबपर " " बहारो मेरा जीवनभी संवारो "  " श्यामे गमकी कसम "  "तू ही सागर तूही किनारा( हे सुलक्षणा पंडितने पंडितने गायलेले गाणे तिला फिल्मफेयर देऊन गेले होते )" ही माधुर्याने भरलेली गाणी कानांना खिळवून ठेवणारी होती

गीतांच्या बोलाबाबत ते गीतात काव्य असण्याबद्दल सजग होते आणि त्यामुळेच बावरी चा अपवाद वगळता आनंद बक्षीच्या वाट्याला ते फारसे गेले नाहीत गुणवत्तेचा आग्रह हा तुम्ही जर यशस्वीही झालात तर ऐकून घेतला जातो जसा कि तो नौशादबाबत ऐकून घेतला गेला खय्यामच्या नशिबाने ह्याबाबत १९८५ नंतर पुन्हा पलटी मारायला सुरवात केली आणि एकापाठोपाठ एक फिल्म्स फ्लॉप व्हायला लागल्या हिट है तो फिट है ह्या चालीने चालणाऱ्या बॉलिवूडमध्ये हे परवडणारे न्हवते त्यातच नंतर बप्पी लाहिरीच्या हिम्मतवालाने संगीताचा बाज पूर्णच बदलला आम्ही लोक आता तरुण झालो होतो आणि आम्हाला फक्त नाचायचं होतं ऐकायचं न्हवतंच बाप्पीची गाणी नाचायला लय भारी असल्याने आम्ही ता थय्या ता थय्या करत बसलो आम्ही खय्याम फेकूनच दिला खरंतर आणि त्यातच त्यांच्या फिल्म्स वाईट होत्या आता संगीतासाठी फिल्म्स बघण्याचा जमाना संपला होता कारण कॅसेट्स आल्या होत्या खय्यामसाठी वाईट फिल्मा बघण्यापेक्षा त्यांचं संगीत कॅसेटवर ऐकणे आमच्या फाटक्या खिशाला परवडेबल होतं नदीम श्रवणमुळे मेलडी परत आली तरी ही मेलडी अभिजात न्हवती तिच्यात एक कामचलाऊपणा होता खय्याम अभिजात होते त्यामुळे फिट्ट होईनात बरं १९८७ नंतरची गाणी आधीच्या दर्जाला मॅच होणारी न्हवती शिवाय नदीम श्रवण संगीतात एक तरी गाणे डान्ससाठी बनवायचे म्हणजे साजण मध्ये देखा हैं पहली बार साजणकी आँखोंमे प्यार हे डान्सिकल होतेच खय्याम असे गाणे देऊ शकत नाहीत अशी त्यांची व इतरांची पण समजूत होती वास्तविक ते डान्सिकल गाणी देऊ शकले असते पण त्यासाठी यश चोप्रासारखा डिरेक्टर असणे आवश्यक होते आणि खय्यामच्या नशिबी तेच न्हवते खय्यामच्या ५० टक्के हिट फिल्म्स यश चोप्रा कॅम्पशी निगडित आहेत ते त्यामुळेच ! अभिजातला सामावून घेण्यासाठी अभिजात दिग्दर्शक लागतात आणि इंडस्ट्रीत स्टारडम फॅशनमुळे त्याचाच अभाव आहे खय्यामना ह्याचा फटका बसला

खय्याम नौशाद स्कूलचे असले तरी त्यांनी पूर्णपणे आपला स्वतंत्र ठसा उमटवला त्यांचा जसा वापर करून घ्यायला हवा होता तसा झाला नाही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे इथे पॉप संगीत हे कायमच चित्रपटसंगीताशी जोडले जाते मग गायनाशी परिणामी जोवर एखादा संगीतकार चित्रपटात यशस्वी होत नाही तोवर त्याला मान्यता मिळणे कठीण जाते एकंदरच सगळ्या गोष्टीची खिचडी करण्याचा आपला स्वभाव संगीतालाही लागू होतो

खय्याम गेले आणि आता अभिजात मेलडीचे काय असा प्रश्नच निर्माण झालाय ओ पी नय्यर हृदयनाथ मंगेशकर जयदेव आणि खय्याम ह्यांनी मेलडीला जे माधुर्य दिले ते अवर्णनीय आहे ते कायमच आपल्यासोबत राहील प्रश्न हाच आहे कि २१ व्या शतकात ह्या मेलडीयस माधुर्याचं काय होणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक


Friday, July 5, 2019

Tuesday, March 7, 2017

धंदेवाईक , प्रायोगिक , समांतर आणि प्रायोगिक श्रीधर तिळवे नाईक 

कुठलीही कला (चित्रपट) संस्कृती यशस्वी होण्यासाठी तिच्यात
१ धंदेवाईक
२ व्यावसायिक
३ समांतर आणि
४ प्रायोगिक कलाकृती येत राहणे गरजेचं असतं ह्यातील प्रायोगिकला लोकप्रियता मिळाली नाही तरी किमान स्वागतता मिळणे फार गरजेचे  ते झालं नाही कि प्रायोगिकता खुंटायला लागते

जे व्यावसायिक प्रोफेशनल आहे त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते जेणेकरून अशा कलाकृतीत घातलेला पैसा वसूल होऊन त्यातून थोडाफार फायदा मिळेल

जे धंदेवाईक कमर्शियल आहे त्याला मात्र नुसती मान्यता मिळून चालत नाही तर प्रचंड लोकप्रियता मिळणे गरजेचे असते त्याशिवाय घातलेला पैसा जो कधी कधी प्रचंड असतो वसूल होत नाही साहजिकच मार्केट आणि ग्राहक ह्या दोन्ही गोष्टी इथे आवश्यक असतात

चित्रपट ह्याला अपवाद नसतात चित्रपटात पैश्याची गणितं फार मोठी होत जातात त्यामुळे प्रायोगिक चित्रपट हा जवळ जवळ अशक्य बनत जातो पैशे बरबाद करण्याची क्षमता असलेला निर्माता मिळाला तरच प्रायोगिक चित्रपट घडू शकतो न्यू वेव सिनेमानंतर चित्रपटात प्रायोगिक चित्रपटाची लाट कधी आल्याचे निदान मला तरी आठवत नाही . जे काही सध्या प्रायोगिक म्हणून येतंय ते प्रत्यक्षात बहुतांशी समांतर आहे समांतर कलाकृती हमखास स्वागतता कमावतात म्हणून नवीन लोक मोठ्या हुशारीने समांतर चित्रपट बनवतात कारण त्यांना समांतर चित्रपट हे मान्यतेकडे न्हेण्याची शिडी आहे हे नीट माहित असते ह्यातील अनेकांना प्रायोगिकतेशी काहीही देणेघेणे नसते व्यावसायिक होता येत नाही म्हणून प्रायोगिक अशीही काही जणांची स्ट्रॅटेजी असते आर्ट सिनेमाच्या नावाने हे खपूही शकते काही मात्र खूपच सिरीयस असतात जे प्रायोगिक झालेले आहे ते त्यांना फार महत्वाचे वाटत असते त्यांना त्या प्रायोगिकतेला पुढे न्ह्यायचे असते किंवा संपन्न करायचे असतात उदाहरणार्थ डॉल्स हाऊस ह्या प्रायोगिक नाटकाचे अनंत काणेकर लिखित घरकुल हे समांतर रूपांतर

अनेकदा समांतर रूप व्यावसायिक दृष्ट्या प्रस्तुत करता येईल असेही वाटू शकते मग व्यावसायिक पातळीवर आचार्य अत्रे डॉल हाऊसचे  व्यावसायिक रूपांतर करून ते घराबाहेर ह्या नावाने सादर करतात त्यासाठी काही आक्षेपार्ह बदल घडवतात आणि मूळ प्रायोगिकतेचा पाया विसविशीत करतात

चित्रपट कलेच्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे कुठला देश स्वतःची म्हणून कुठली मुख्य शैली निवडतो ?फ्रान्सच्या बाबत ही शैली प्रामुख्याने प्रायोगिक व समांतर असल्याचे दिसते तर यूएसए विशेषतः हॉलिवूड व्यावसायिक शैली प्रधान शैली म्हणून निवडतो भारत विशेषतः बॉलिवूड मात्र धंदेवाईक शैली स्वतःची मुख्य शैली  म्हणून निवडतांना दिसतो साहजिकच बुद्धिवंतांच्यामध्ये बॉलिवूडबद्दल एक आंतरिक असमाधान आढळते
१९९९ नंतर मात्र हळहळू व्यावसायिक शैली हीही प्रधान शैली म्हणून विकसित होतांना दिसते विशेषतः बायोपिक्स आणि बायोसिन्स ह्यांच्या आधारे आलेल्या भाग मिल्खा भाग मेरीकॉम  वा तलवार सारख्या चित्रपटांनी ही व्यावसायिक शैली हिट होण्याची गॅरंटी निर्माण केली ज्याचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर होऊन मराठीतही लोकमान्य बालगंधर्वसारखे व्यावसायिक बायोपिक निर्माण झाल्याचे दिसते

फिक्शनमध्ये दिल चाहता हैं लगान मुन्नाभाई एम बी बी एस सारख्या चित्रपटांनी व्यावसायिक शैलीही यशस्वी होऊ शकते हे पुन्हा एकदा लक्षात आणून दिले वास्तविक व्ही शांताराम हे ह्या शैलीचे मुख्य पायोनियर त्यांचे माणूस , दो आँखे बारह हाथ , डॉ कोटणिसकी अमर कहाणी ( हा भारतातील पहिला व्यावसायिक बायोपिक चित्रपट ) ह्यांनी हा पायंडा पाडला होता पुढे प्यासा , आवारा , जोगन , नया दौर ह्या सारख्या चित्रपटांनी तो पुढे न्हेला होता पण नंतर उत्कृष्ट संगीत आणि रोमान्स ह्यांच्या धंदेवाईक मिश्रणाने ह्या पायाला उद्धवस्त केले सलीम जावेदनी सोशल ऍनगरही धंदेवाईक करून दाखवला आणि त्यामुळे सोशल कमिटमेण्टही बाजारू गोष्ट बनली हळूहळू ह्या कढीला शिळेपणा प्राप्त झाला आणि त्यातूनच पुन्हा एकदा व्यावसायिकतेची वाट निर्माण झाली प्रश्न असा आहे कि ह्यापुढे हॉलीवूडसारखी आपलीही प्रधान शैली हीच व्यावसायिक शैली होणार कि दबंग सारखे धंदेवाईक चित्रपट धंदेवाइकतेचा नवा पायंडा पाडणार ?

माझ्या मते १९५७ नंतर हळूहळू व्यावसायिक हटत गेला तसे होणार नाही ह्यापुढे बॉलिवूड धंदेवाईक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट निर्माण करत राहील दिल चाहता हैं आणि मेरीकॉम  सारखे चित्रपटही येत राहतील आणि दबंग सारखेही !

ह्यात प्रश्न असा निर्माण होतो कि ह्यात प्रायोगिक आणि समांतरचे काय ? तर ह्यांचे कठीण दिवस पुढेही चालू राहतील हेच त्याचे प्रामाणिक उत्तर आहे .

श्रीधर तिळवे नाईक








Friday, October 21, 2016

निसर्गवाद , वास्तववाद , देशीवाद   आणि दृकप्रत्ययवाद ह्यांच्यावर पांच प्ले ऍनालिसिस वर तीन आणि ग्रीक शोकांतिकेवर दोन अशी दीड तासांची दहा व्याख्याने देतांना मजा आली . ह्यावेळीही प्रतिसाद जबराट होता . मागच्याप्रमाणे ह्याहीवेळी काही  दीड तासाची व्याख्याने दोन तासांवर गेली . शिवाय संगीताचे काम त्यामुळे गेले पांच दिवस वीस तास काम आणि चार तास झोप असा प्रकार चालू होता नवीन पिढीचा आय क्यू आमच्या पिढीपेक्षा अधिक उजवा आहे . त्यामुळे शंका अनेक !फ्रेंच विद्यार्थिनीला प्लेटो ,ऍरिस्टॉटल , देरिदा शिकवणे हाही एक अनुभव कारण शंका थेट युरोपिअन परंपरेतून आलेल्या !आता दोन दिवस विश्रांती घ्यावी म्हणतोय .